परभणी
परभणी जिल्ह्यात मागील मागील तीन दिवसापासून मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कापूस, ज्वारी, हरबरा या पिकांसह फळबागाचे देखील प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्याचा खरीप आणि रब्बी दोन्ही हंगाम हातातून गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. येणाऱ्या काळात जनावरांच्या चाऱ्याचा देखील प्रश्न निर्माण झाला असून राज्य सरकारने तात्काळ दुष्काळ जाहीर करावा त्याचबरोबर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी देखील करावी अशी मागणी खासदार संजय जाधव यांनी केली आहे.
खासदार संजय जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली आहे. परभणीचे पालकमंत्री संजय बनसोडे यांनी देखील परभणी जिल्ह्यात तात्काळ यावे आणि नुकसानीची पाहणी करावी. राज्य सरकारने यापूर्वीही दुष्काळाच्या बाबतीत परभणी जिल्ह्यावर अन्याय केलाच आहे मागील वेळेस जेव्हा दुष्काळ जाहीर झाला आणि मदत करण्याची वेळ आली त्यावेळेस परभणी जिल्ह्याला बघून बाकी सर्वत्र मदत करण्यात आली. यावेळेस तरी परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत मिळावी ही अपेक्षा खासदार संजय जाधव यांनी व्यक्त केली.
महाविकास आघाडी सरकार असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले नाही केवळ पंचनामे न करता सरसकट शेतकऱ्यांना त्यावेळेस मदत देण्यात आली होती. त्याचबरोबर शेतकऱ्यांना विमा देखील त्यावेळेस विमा कंपन्यांच्या कार्यालयावर मोर्चे काढून मिळवून देण्यात आला होता.त्यामुळे या सरकारनेही सरसकट शेतकऱ्यांना मदत करावी असे खासदार संजय जाधव म्हणाले.
https://youtu.be/rsO7Ojef3hU?si=_VcZa29bdLsCCKVG
महाराष्ट्रात अतिवृष्टी होऊन शेतकरी हवालदिल असताना तेलंगणामध्ये मुख्यमंत्री प्रचाराला का गेले?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तेलंगणामध्ये प्रचारासाठी जाणे हा त्यांच्या अधिकाराचा विषय असला तरी इकडे महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली आहे शेतकरी हवालदिन झाला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री शिंदे साहेब आपण तेलंगणामध्ये जाऊन प्रचार करत आहात तो कशासाठी तुमच्या पक्षाचा एकही उमेदवार तेथे उभा नसताना तुम्ही हा प्रचार का करत आहात. येणाऱ्या काळात हाच भाजप तुमच्या मुळावर उठणार आहे आणि तुम्ही त्याच भाजपाचा प्रचार करत आहात हे दुर्भाग्य असल्याचेही खासदार संजय जाधव म्हणाले.
पालकमंत्री संजय बनसोडे यांनी आता तरी परभणीला यावे
भाजप सरकारच्या काळात परभणी जिल्ह्याला यापूर्वी मिळालेले पालकमंत्री तानाजी सावंत हे ध्वजारोहणाला देखील उपस्थित राहिले नाहीत. त्याचबरोबर आता संजय बनसोडे यांना परभणीचे पालकमंत्री करण्यात आले आहे पण पालकमंत्र्यांची घोषणा होऊन बरेच दिवस झाले तरी अद्यापह पालकमंत्री संजय बनसोडे परभणीकडे फिरकले नाही. पण आता अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आता तरी पालकमंत्री संजय बनसोडे यांनी परभणीला यावे. जिल्ह्यातील बाधित क्षेत्राची पाहणी करावी आणि राज्य शासनाकडे परभणी जिल्ह्याला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा असे आव्हान खासदार संजय जाधव यांनी केले आहे.